हलक्यात घेतलं तर बसणं- फिरणं कठीण होईल

मनोज जरांगे पाटलांनी सरकारला केलं सावध

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. सध्या देखील त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर ते एका मध्यामाशी बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारला इशारा दिला. सोबतच पुढच्या रणनीती बाबतही सतर्क केल आहे.

 

शक्य -अशक्याच्या गोष्टी आंदोलनात नसतात

माझं ध्येय आरक्षण मिळवणं आहे. माझ्या जातीने थोडा वचका दाखवला आहे. नंतर बसणं- फिरणं कठीण होईल. आपल्याला हलक्या घेतलं तर सरकारलाही कळेल. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला आहे. फडणवीस बळ देत असतील, आम्हाला आरक्षण मिळत असेल तर चांगलंय. फडणवीस आमचे दुश्मन नाहीत. आमच्यावर बोललं तर सोडलं नाही. सरकारला वेळ दिलाय. शक्य -अशक्याच्या गोष्टी आंदोलनात नसतात. आम्हाला आरक्षण नाही दिलं तर लढायला समाज तयार आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

 

ओबीसी समाजानेही आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. शासनाकडून आम्हाला पत्र हवा आहे की, मराठा समाजाला ओबीसी समाजाला धक्का लागणार नाही आणि कसा लागणार नाही, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय. यावर जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे.लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. त्यांना आमचा विरोध नाही. त्यांच्यावर उत्तर द्यायचं? एकही ओबीसी नेत्याला बोललो नाही. बबनराव तायवाडे आणि इतर लोकांना काही बोललो नाही. ते विरोधक नाही. ज्यांना मानलं त्यांना मानलं आहे. तो विरोधक आहे.काय म्हणायचं तो त्यांचा प्रश्न आहे.दुसऱ्यांचे मुल डोळ्यासमोर ठेवला पाहजे. मराठ्याचं मुलं मोठं झाले पाहजे हे छातीवर हात ठेऊन विचार केला पाहिजे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय.

 

 

नंतर कोण काय गमावेल ते समजेल..

मुख्यमंत्री एका जातीचे नाही. मुख्यमंत्र्याला जातीत तोलायच नसतं. मुख्यमंत्र्याला कुणी काय म्हणावं हा ज्याचा त्याचा प्रश्न.. मी प्रवक्ता नाही. एक वर्ष झालं आता काय मिळवलं, काय गमावलं हे सांगेल. 13 जुलै नंतर हे सांगता येईल. नंतर कोण काय गमावेल हे पण समजेल, असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय.

 

 

तर त्याचं कल्याण झालं असतं..

प्रकाश शेंडगे यांच्या भूमिकेवरही जरांगेंनी प्रतिक्रिया दिलीय. लोकशाहीत कोण कुणाला लढू नका म्हणत. आम्ही एकडून तुम्ही तिकडून तो. मात्र एवढ्या मोठ्या माणसाने बोलू नये. धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळवण्यासाठी केली असती, तर बरं झालं असतं. आम्हाला विरोध करायचं काम केल्या पेक्षा धनगर समाजासाठी केलं असतं तर त्या समाजाचं कल्याण झालं असतं. आपण आपला राजकीय विचार समोर ठेवण्यापेक्षा धनगर समाजासाठी विचार करा, असं मत मनोज जरांगे यांनी व्यक्त केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.