महाराष्ट्रावर आता लोडशेडिंगचं संकट !

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्रासमोर आता लोडशेडिंगचं संकट घोंघावत आहे. यंदा राज्यात कमी पडलेला पाऊस आणि वीजेची मागणी वाढल्याने आता राज्यात इमर्जन्सी लोडशेडिंग करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राज्यात आता रोज अर्धा तास ते दोन तासांचे लोडशेडिंग होणार आहे.

यंदा  राज्यात पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांनी शेतीसाठी प्रचंड पाण्याचा उपसा केला. यामुळे विजेचा तुटवडा निर्माण होण्यावर होत आहे. त्यामुळे आपत्कालीन लोडशेडिंग करण्यात येत आहे. विजेची मागणी जशी वाढेल त्यानुसार हा लोडशेडिंग करण्यात येत आहे. कधी अर्धा तास, कधी एक तास तर कधी दीड तासांपर्यंत लोडशेडिंग करण्यात येत आहे. वाढीव मागणी कमी झाली किंवा पाऊस पडल्यास आल्यास लोडशेडिंग आपोआप बंद होईल असं महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

मान्सूनच्या सुरुवातीपासूनच संपूर्ण देशात मान्सूनमध्ये पावसाची तूट वाढत गेली. ऑगस्ट अखेरपर्यंत देशातील पावसाची तूट 9 टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यातच पुन्हा एकदा मान्सून ब्रेकची स्थिती असल्याने ही तूट आणखी वाढण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. देशातील काही भागात सध्या चांगला पाऊस झाला आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 22 टक्के पावसाची तूट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात देखील 1 जूनपासून सरासरीच्या 19 टक्के पावसाची तूट पाहायला मिळत असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.