कोल्हापूर जिल्ह्यातील धबधबे ठरताय जीवघेणे, पर्यटनास बंदी 

0

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगढ तालुक्यात रांगणा किल्ल्यावर जीव धोक्यात घालून हौशी पर्यटकांकडून झालेल्या प्रकारांनंतर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. भुदरगड तालुक्यातील जुलै ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत रांगणा किल्ला, शिवडाव बुद्रुक येथील नाईकवाडी धबधबा व दोनवडे येथील सवतकडा  धबधबा तसेच भुदरगड तालुक्यालगत असणाऱ्या तोरस्करवाडी धबधब्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. स्थानिकांना सुद्धा तेथे जाण्यास मनाई करण्यात आली असून, अशी माहिती भुदरगड तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा तहसिलदार अश्विनी वरुटे-अडसूळ यांनी दिली आहे. 18 जुलै रोजी रांगणा किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेले 17 पर्यटक अडकले होते. त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. या घटनेची पुननावृत्ती होऊ नये किंवा एखादी दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पावसाळा संपेपर्यंत रांगणा किल्ल्याकडे तसेच शिवडाव बुद्रुक येथील नायकवाडी धबधबा व दोनवडे येथील सवतकडा धबधबा व नितवडे येथील तोरस्करवाडी धबधबा इत्यादी ठिकाणी असलेल्या पर्यटनस्थळांकडे पर्यटनासाठी जाऊ नये, असे आवाहन अडसूळ यांनी केले आहे.

पावसाळा संपेपर्यंत पर्यटनासाठी जाऊ नये 

भुदरगड तालुक्यातील रांगणा किल्ल्यावर पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी फार मोठ्या प्रमाणात होत आहे. रांगणा किल्ल्याच्या परिसरात पावसाळ्यामध्ये जाण्यासाठी अत्यंत किचकट मार्ग आहे. किल्ल्यावर जातांना वाटेत ५ ते ६ ओढे व नाले असून, ते जीवघेणे ठरू शकतात. किल्ल्यांच्या परिसरात नेटवर्क नसल्याने कोणाशीही संपर्क होऊ शकत नाही. १८ जुलै रोजी रांगणा किल्ल्यावर पर्यटनासाठी गलेले १७ नागरिक त्याठिकाणी अडकले होते. या घटनेची पुनरावृत्ती होऊ यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पावसाळा संपेपर्यंत रांगणा किल्ल्याकडे तसेच शिवडाव बुद्रुक  येथील नायकवाडी धबधबा व दोनवडे येथील सवतकडा धबधबा व नितवडे येथील तोरस्करवाडी धबधबा इत्यादी ठिकाणी असलेल्या पर्यटनस्थळांकडे पर्यटनासाठी जाऊ नये, असे आवाहन अडसूळ यांनी केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.