लोकशाही न्यूज नेटवर्क
किनगांव; पविञ रमजान महिन्यास दि.०२/०४/२०२२ पासुन प्रारंभ झाली आहे.महावितरने भारनियमन बंद करावे.अशी मागणी येथील जाकेर भाई मिञ मंङळाच्या वतीने महावितरणच्या सहाय्यक अभियंता यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.जाकेर भाई मिञ मंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की.
रमजान निमित्त मुस्लिम बांधव पहाटेच्या वेळी स्वयंपाक,नमाज,सहर व इत्यादी कामाच्या वेळी वीज पुरवठा सुरळीत चालू ठेवावा व किरकोळ कारणावरून किनगांव व परिसरातील वीज पुरवठा खंङित करण्यात येऊ नये.परंतु सध्या या भागात वारंवार वीज खंडित होत आहे.
हे निवेदन महावितरणच्या सहाय्यक अभियंता यांच्याकडे देण्यात आले.या निवेदनावर जाकेर भाई मिञ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जाकेर कुरेशी,अखिल शेख,इरफान कुरेशी,नयुम कुरेशी,कलीम सय्यद,मोहसीन बागवान,बबलु शेख,साजीद शेख,रतन कुरेशी,उमर पठाण,असमत शेख,दिपक सुर्यवंशी, मजहर शेख,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.