मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
बॉलिवूड क्वीन कंगना रानौत (Kangana Ranaut) तिच्या आगामी ‘चंद्रमुखी २’ (Chandramukhi 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तर दुसरीकडे तिचा आणि जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. दोघेही एकमेकांवर आरोप करत आहेत.
आता पुन्हा एकदा कंगना रानौतने जावेद अख्तरविरोधात कोर्टात अपील केले. कंगना रानौतने दावा केला आहे की, जावेद अख्तर मुद्दाम कोर्टात हजर राहत नाहीत. कंगनाने त्यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंटची मागणी केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईच्या अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात गीतकार जावेद अख्तर त्यांच्याविरुद्ध ‘धमकी’ प्रकरणात जामीनपात्र वॉरंटी काढण्यासाठी याचिका दाखल केली आहे. रिपोर्टनुसार, कंगनाने कथितपणे जावेद अख्तर ‘इच्छुकपणे’ कोर्टात हजार राहण्यास अपयशी ठरल्याने आणि सुनावणीकडे दुर्लक्ष केल्याने वॉरंटची मागणी केली आहे.
जावेद अख्तर यांनी ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजार राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. तथापि, त्यांचे वकील जय भारद्वाज यांनी त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला मेडिकल एमेरजन्सी असल्याने न्यायालयात हजार राहता येत नसल्याचे सांगितले होते.
कंगनाचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी याला विरोध केला. रिपोर्टनुसार रिजवान यांनी दावा केला आहे की, जावेद अख्तर मुद्दाम कोर्टात हजार झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाच्या हितासाठी वॉरंट जारी केले जावे. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने याचिकेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. त्या बदल्यात, जावेद अख्तर यांना पुढील सुनावणीसाठी जमीन प्रक्रियेचे पालन करण्याची संधी मिळाली.