अनैतिक संबंधातून समतानगरातील तरुणाचा खून; एकास अटक..

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील समतानगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सागर नरेंद्र पवार (वय 28) या तरूणावर २५ मार्चच्या रात्री चाकू हल्ला झाला होता. दरम्यान पहाटे त्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

सागर पवार हा जळगाव शहरातील समता नगर भागामध्ये एकटाच राहत होता. सागरवर २५ मार्चच्या रात्री चाकूहल्ला झाला होता. त्यानंतर त्याला परिसरातील नातेवाईकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी पाच वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी पोलिसांनी अमित खरे (वय ३३) या तरूणाला ताब्यात घेतले आहे. मयत सागरचे अमितच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचे अमितला समजले होते. यामुळे त्याने सागरचा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली असून पोलिसांनी त्याला अटक केले आहे.

सागरच्या मृतदेहावर जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत आले. यावेळी त्याच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.