जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील कुसुंबा येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ लहान मुलीला मारण्याचा जाब विचारल्याचा कारणावरून तरूणाला लाकडी दांडाने बेदम केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शुक्रवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविंद्र शांताराम कोळी (वय २६, रा. ग्रामपंचायत कार्यालयाजवळ कुसुंबा ता. जि.जळगाव) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविंद्र कोळी यांचा मुलगा करण याने शुक्रवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता शेजारी राहणाऱ्या कविताबाई (पुर्ण नाव माहित नाही) हिच्या लहान मुलीला मारले. याबाबत रविंद्र कोळी कविताबाई यांना समजविण्यासाठी गेला असता कविताबाई, संगिता यशवंत पाटील, कविताबाईचा भाऊ आणि संगिताबाईचा मुलगा (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. कुसुंबा ता.जि.जळगाव यांनी शिवीगाळ केली.
तर संगिताचा मुलगा याने रविंद्र कोळी यांचे दोन्ही हात पकडून लाकडी दांडक्याने डोक्याला बेदम मारहाण केली. यात रविंद्र कोळी हा जखमी झाला आहे. रविंद्र कोळी यांनी सकाळी १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चौघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस कान्स्टेबल गफुर तडवी करीत आहे.