कारचा भीषण अपघात, एकाच परिवारातले तीन जण ठार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

नाशिक येथून इज कार्यक्रम करून अमळनेरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीचा भीषण अपघात झाला आहे. धुळे तालुक्यातील नवलनगर जवळील छोट्या पुलाखाली गाडी कोसळून हा अपघात झाला. अपघातात अमळनेरचे ३ जण ठार झाले, तर चारजण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ६. ३० च्या सुमारास झाला. सरलाबाई पंडित पाटील (वय ४५), मीनाबाई राजेंद्र पाटील (वय ५०) व शाहू विजय पाटील (वय १०) अशी मयत लोकांची नाव आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार नाशिक येथून गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून कारने परतणाऱ्या पाटील परिवार काळाने घाला घातला. त्यांची कार पुलाखाली कोसळून दहा वर्षाच्या मुलासह तिन जण ठार झाले. तर चार जण जखमी झाले. शुक्रवार हा पाटील परिवारासाठी अत्यंत वाईट ठरला. हा भीषण अपघात शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास नवलनगरजवळ घडला. हा अपघात एवढा भीषण होता की अनेकांच्या अंगाचे थरकाप उडाला. या अपघातात सरलाबाई पंडीत पाटील (वय ४५) मीनाबाई राजेंद्र पाटील (वय ५०), व शाहू विजय पाटील (वय १०.) यांचा जागीच मृत्यू झाला. पाटील परिवार कारने (क्र. एमएच ०४ एफझेड३६८९) अमळनेरकडे येत होता.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.