हतनुर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग ! ( पहा व्हिडीओ )

0

जिल्हाधिकाऱ्यांची निंबोल गावात भेट ; नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

जळगाव:- सध्या जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळे हातनुर धरण भरल्यामुळे हातनूर धरणाचे ४१ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे. हतनूर धरणातून 10580.00 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग प्रशासनाकडून करण्यात आला असून धरणाच्या काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीत किंवा घाटाजवळ न जाण्याचाही आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी हतनूर धरण क्षेत्रातील निंबोल या गावी भेट देऊन पूरस्थितीची पाहणी करून अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.

दरम्यान हतनूर धरणाच्या (पूर्णा व तापी नदीच्या) पाणलोट क्षेत्रातील पाऊस व येव्याचा अभ्यास करता तसेच धरण पातळीत होणारी वाढ विचारात घेवून १६ रोजी 04.00 वा. हतनूर धरणातून 10580.00 क्युमेक्स ( 374214.6 क्युसेक्स ) प्रवाह नदीपात्रात सोडणेत आलेला आहे. त्यासाठी धरणाचे 41 गेट पूर्ण उघडून प्रवाह सोडणेत आलेला आहे.अशी माहिती जळगाव पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे.

हातनुर धरण क्षेत्रामध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील मेहून, चिंचोल, कोथळी ,मुक्ताईनगर ,चांगदेव ,घोडसगाव, उसंडे ,पंजाने, मिळोदे, खामखेडा ,पिंपरी ,नांदूर अंतरली, आंबे, मेंढोरे, चिंचखेडा, रावेर तालुक्यातील तांदलवाडी, सिंगर ,सिंगाडी, पोरी, अजनाड, पतोडी, मंगलवाडी ,सुलवाडी ,थेरोडे, भामलवाडी ,कांडवेल ,कोडे भुसावळ तालुक्यातील टहाकळी ,या गावांसह धरणाखाली येणाऱ्या भुसावळ तालुक्यातील हातनुर, सावतर ,निंभोरा ,तपत कटोरा, उधळी, लूमखेडा ,रंगवखेडा ,रायपूर ,सुदगाव ,दुधखेडा, कठोरे, दुधखेडा ,कासवा, या धरण क्षेत्रात येणाऱ्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.