जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील शिवाजी नगर परिसरात चोरट्यांनी एका घरातून २० हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील शिवाजी नगर परिसरातील असलेले मारुती मंदिराच्या बाजूला वास्तव्यास असलेले प्रेमलता तिवारी (वय ४०) आहे. दि ११ रोजी घर बंद असून दरवाज्याची दोरी तोडून चोरट्यांनी घरातील तब्बल २० हजाराचा मुद्देमाल चोरून नेला आहे. यात १५ हजारांची रोख रक्कम तर २ मोबाईल असा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी शहर पोलिसात अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.विजय निकुंभ हे करीत आहेत.