जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेंदालाल मिल परिसरातील लक्ष्मीनगर भागातील एकमेकांना शिवीगाळ करीत हाणामारी केल्याची घटना घडली. सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी सहा जणांना शहर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध फिर्याद देण्यात आली.
शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असतांना गेंदालाल मिल जवळील लक्ष्मी नगर भागात काही जण सोमवारी ४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता आपापसात वाद घालत असल्याची माहिती मिळाली. पोलिस त्या ठिकाणी पोहोचले असता, सह जण वाद घालून शिवीगाळ करत होते. पोलिसांनी त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी एकही न ऐकता शिवीगाळ सुरूच ठेवला. त्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग झाल्याप्रकरणी ठाण्याचे पो.को मनोज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहरुख शेख गाणी शेख, मोहन शेख आरीफ, कासीम शेख, समीर उर्फ गोलू रसूल बेग, विशाल रवींद्र जैस्वाल, वैभव रवींद्र जैस्वाल या सहा जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ प्रदीप पाटील करीत आहे.