“ते आमच्याकडे फक्त त्यांच्या मर्जीनेच यायचे”, वडिलांविषयी गश्मीर महाजनी झाला व्यक्त

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

प्रसिद्ध अभिनेता रवींद्र महाजनी (Rabindra Mahajani) यांच्या मृत्यू मुळे सर्वांनाच धक्का बसला होता. सर्वांनी त्याचा मुलगा व प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmir Mahajani) याला धारेवर धरला. पण प्रत्येक्षात एक व्यक्तीच्या २ बाजू असतात. मात्र हे बघायला कोणी तयार नसते. जे डोळ्यांना दिसेल तेच खरा असं धरून बसतो. त्यात गश्मीर महाजनी व रवींद्र महाजनी यांच्या नात्यावर देखील अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर सर्वसामान्यांनी विविध प्रश्नांचा भडीमार केला. अनेकांनी त्यांचा मुलगा गश्मीर महाजनीवर टीका केली. पण, या सर्व ट्रोलिंगवर आता गश्मीर महाजनी मोकळेपणाने व्यक्त झाला आहे. एका युट्युब चॅनेल ला दिलेल्या मुलाखतीत गश्मीरने सर्व घटना आणि त्यामहिला पार्श्वभूमी उलगडून सांगितली आहे.

“ते आमच्याकडे फक्त त्यांच्या मर्जीनेच यायचे”- गश्मीर महाजनी
गश्मीर १४-१५ वर्षांचा असतांना रवींद्र महाजनी निघून गेले होते. तेव्हापासून गश्मीरने कुटुंबाची जबाबदारी उचलली होती. याविषयी तो म्हणाला “ते आमच्याकडे फक्त त्यांच्या मर्जीनेच आले”. कधी सणाला तर कधी त्यांना वाटलं तेव्हा ते यायचे आणि जायचे. ते आर्थिकदृष्ट्या सबळ होते. त्यामुळे कुठल्याही हलाखीच्या परिस्थितीत त्यांचं निधन झालं नाही. माझ्याकडे जरी ते राहायला आले तरी स्वतःची काम ते स्वतः करत. ते दुसऱ्यांच्या हाताचे जेवण सुद्धा जेवायचे नाही. ते त्याच जेवण स्वतः बनवत असत. त्यांना केअर टेकर नको होता. आम्ही त्यांच्या घरी मदतीला कोणाला पाठवलं तरी ते नकार द्यायचे. त्यांच्या निधनाच्या एक आठवड्याआधी ते व्यवस्थित जिमला जात होते. त्यांची ही जगण्याची पद्धत होती. एखाद्या माणसाला एकटं राहायला आवडचं. यात कोणालाच दोष देता येणार नाही.”

कुटुंबियांचे फोन नंबर केले ब्लॉक
गेल्या महिन्यापासून ते फार एकटे राहू लागले होते. मला जेव्हा मुलगा झाला, तेव्हा जन्माच्या वेळीच त्यांनी नातवाचा चेहरा पहिला. त्यानंतर ते पुन्हा निघून गेले आणि परत आलेच नाही. मी अधूनमधून त्यांना मुलाचे फोटो आणि व्हिडिओ पाठवायचो, एक-दोनदा त्यांनी ते पहिले देखील आणि नंतर माझा नंबर ब्लॉक केला. ही तीन-साडेतीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. यात मी कोणालाच दोष देत नाही. पण त्यांची बाजू काय असेल ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. कदाचित नातवाचे फोटो आणि व्हिडीओ पाहून ते हळवे होऊ लागले होते. त्यामुळे पुन्हा त्यांना कुटुंबात अडकायचं नव्हतं. म्हणून त्यांनी आमचे नंबर ब्लॉक केले असावेत”, असं तो पुढे म्हणाला.

Leave A Reply

Your email address will not be published.