पवार कुटुंबाकडून जीवाला धोका- सदाभाऊंचा आरोप; वळसे पाटलांनी वाढवली सुरक्षा !

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सदाभाऊ खोत यांची सुरक्षा वाढवण्यात येणार आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत माहिती दिली. पवार कुटूंबापासून मला धोका आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं होतं, त्यानंतर आता आज सकाळीच राज्याच्या पोलीस प्रमुखांना सदाभाऊ खोत यांची सुरक्षा वाढवण्याची सूचना दिली असल्याचं गृहमंत्री यांनी सांगितले.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “आम्ही नेहमीच शरद पवारांना भेटत असतो, अनेक गोष्टी त्यांच्या कानावर घालायच्या असतात, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं असतं, त्यानुसार भेट झाली.”

पवार कुटुंबापासून आम्हाला धोका आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं होतं. त्यावर दिलीप वळसे पाटील म्हणाले की, “मला वाटत नाही की सदाभाऊंच्या जीविताला धोका आहे. तरीसुद्धा त्यांनी जी भीती व्यक्त केली आहे, त्यांचं जीवन सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने मी आज सकाळीच राज्याच्या पोलीस प्रमुखांना सूचना दिल्या आहेत की सदाभाऊ खोत यांची सुरक्षा वाढवावी.”

 

Leave A Reply

Your email address will not be published.