धीरेंद्र शास्त्रींच्या अडचणीत वाढ, मुंबईत तक्रार दाखल

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

वादग्रस्त वक्तव्य करणं धीरेंद्र शास्त्रीला चांगलंच अंगाशी आले आहे. काही दिवसापूर्वी साईबाबांविरोधात त्यांनी वादग्रस्त विधान केलं आणि नागरिकांच्या निशाण्यावर आले. महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांविषयी (Shirdi Saibaba) वादग्रस्त वक्तव्य करणं बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र कृष्णा शास्त्रीला (Dhirendra Krishna Shastri) चांगलंच महागात पडलं आहे. या वक्तव्याप्रकरणी एकीकडे धीरेंद्र शास्त्रीवर जोरदार टीका होत आहे तर दुसरीकडे त्याच्या अडचणीत वाढ होत चालली आहे. याप्रकरणी धीरेंद्र शास्त्रीविरोधात मुंबईतील पोलिस (Mumbai Police) ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

साईंबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी धीरेंद्र शास्त्रीविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेने वांद्रे पोलिस ठाण्यामध्ये यासंदर्भात लेखी तक्रार देण्यात आली आहे. युवासेना नेते आणि शिर्डी साई संस्थानाचे माजी विश्वस्त राहुल कनाल (Rahul Kanal) यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.