खांद्याला धक्का लागला आणि तरुणाला जीवानिशी संपवले

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

दिल्लीतून मन सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. एका २५ वर्षीय तरुणाची क्रूरतेने हत्या करण्यात आली आहे. आरोपींना तरुणावर कुत्रा सोडला होता. नंतर शॉलने त्याचा गळा आवळून चाकूने हल्ला केला. यात तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. क्रूरतेनं तरुणाची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गुरप्रीत असं मृत तरुणाचं नाव आहे. तो समयपूर येथे आपल्या कुटुंबासह राहत होता. आई, बाबा, मोठा भाऊ दोन बहिणी असं सुंदर कुटुंब कायम हसत खेळत आयुष्य जगत होत मात्र मुलाच्या निधनामुळे आता त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नेमकं काय घडले?

रविवारी गुरप्रीत आणि त्याच्या दोन लहान बहिणी बाहेर फिरण्यासाठी गेल्या होत्या. बाजारात गेल्यावर तिथे एका तरुणाला त्याचा धक्का लागला. खांद्याला धक्का लागल्याने गुरप्रीत आणि त्या तरुणांमध्ये वाद सुरु झाला. वाद इतका टोकाला गेला की, दोघांमध्ये शिवीगाळ सुरु झाला आणि नंतर दोघेही एकमेकांना मारहाण करू लागले.

हे सर्व पाहून गुरप्रीतच्या बहिणी घाबरल्या, त्यांनी ही भांडणे थांबवली आणि त्याला घरी नेले. घरी गेल्यावर दुसऱ्या दिवशी बाजारात हाणामारी करणारा तरुण आपल्या मित्रांसह गुरप्रीतच्या घरी आला. बदल घेण्यासाठी त्याने घरातून गुरप्रीतला बाहेर काढले. सुरुवातीला या तरुणांच्या टोळक्याने सुरुवातीला गुरुप्रीतवर कुत्रा सोडला. त्यानंतर शॉलने त्याचा गळा आवळला. तसेच चाकूने त्यावर वार करत त्याची हत्या केली.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थाळी धाव घेताली. गुरप्रीतचे शव ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केलीये.

Leave A Reply

Your email address will not be published.