“भाजी चांगली झाली नाही” या शुल्लक कारणावरून पतीने चक्क पत्नीला जिवंत जाळले 

उपचारादरम्यान विवाहितेचा मृत्यू 

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

बायकोच्या हाताची भाई आवडली नाही म्हणून पतीने थेट तिलाच संपवले. मृत्यूपूर्वी मॅजिस्ट्रेट समोर दिलेल्या जबानीत महिलेने तिची आपबिती सांगितली. दारुड्या नवऱ्याने बायकोला जिवंत जाळले. हि घटना समोर आल्यावर सर्वांचेच मन सुन्न झाले. एवढ्या शुल्लक कारणावरून कोणी असं करू शकता का? असाच प्रश्न सर्वानांच पडला आहे. पोलिसांनी याप्रकारणी गुन्हा दाखल केला आहे.

उत्तर प्रदेशातील बांदा जवळ पीडित महिला राहत होती.  जोगमाया असे तिचे नाव असून ती ३० वर्षांची होती. पती मुकेश हा नेहमीच तिला मारहाण करत असे. जेवण चांगले केले नाही, भाजीला चव नाही, असे सांगत तो नेहमीच तिचा छळ करत असे. पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले. घटनेच्या दिवशी देखील मुकेश घरी आला आणि बायकोला मारहाण करू लागला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली.

मला मारू नका, अशी विनवणी केली. 

पीडित महिला तिच्या पतीकडे न तिला न मारण्याची सतत विनंती करत होती. शेजाऱ्या-पाजाऱ्यांनी देखील या गोष्टीला दुजोरा दिला. पीडितेच्या पती तिला दररोज मारायचा तिने अनेक वेळा तिच्या नातेवाईकांनाही फोन केला. ते घरी येउन त्याला समजवायचे, पण तो सुधारलाच नाही. रविवारी देखील त्याने भाजी चांगली बनली नाही. या शुल्लक कारणावरून पत्नीला बेदम मारले. एवढयावरच त्याचे मन भरले नाही म्हणून त्याने तिच्यावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळले.

मृत्यूपूर्वी महिलेने दिली जबानी 

मृत्यूपूर्वी दिलेल्या जबानीत पीडित महिलेने सांगितले की, भाजी चांगली झाली नाही, या कारणाने पतीने आधी तिला बेदम मारहाण केली आणि नंतर रॉकेल ओतून जिवंत जाळले. पोलिसांनी याला दुजोरा दिला असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला.

Leave A Reply

Your email address will not be published.