टेन्शन वाढलं.. देशात कोरोना रुग्णांची वाढ; 24 तासांत 29 जणांचा मृत्यू

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

देशात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतांना दिसत आहे.  दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने देशात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 17,092 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर यादरम्यान 29 मृत्यूची नोंद झाली आहे. देशात दैनंदिन कोरोना पॉझिटिव्हीटी दर 4.14 टक्के इतका आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती

देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1,09,568 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 14684 लोक कोरोनाने बरे झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 4189, केरळमध्ये 3724 आणि तामिळनाडूमध्ये 1321 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत 4,28,51,590 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

दुसरीकडे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात सर्वाधिक 4 मृत्यू झाले आहेत. त्यानंतर दिल्लीत 3, पंजाब आणि केरळमध्ये प्रत्येकी 2 जणांचा मृत्यू झाला. बिहार, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये 1-1 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय केरळमधील 13 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या आता काही प्रमाणात कमी झाली. आहे. गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे 3 हजार 249 नवे रुग्ण आढलून आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे यादरम्यान, 4 हजार 189 जणांनी कोरोनावर मात केली. पुढील 15 दिवसांत रुग्णसंख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात सध्या 23 हजार 996 रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच जळगाव जिल्ह्यात देखील काल दि. 2 जुलै रोजी कोरोनाचे  18 नवे रुग्ण आढळले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.