लोकशाही न्यूज नेटवर्क
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झारखंड हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. 2018 मध्ये अमित शहा यांच्या विरोधात टिप्पणी केल्या प्रकरणात कोर्टाने निर्णय देताना राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावली आहे. आता या प्रकरणात राहुल गांधी यांच्या विरोधात कनिष्ठ न्यायालयात खटला चालविला जाणार आहे. राहुल गांधी यांनी एमपी एमएलए कोर्टाने जारी केलेल्या समाजविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हे याचे का पेटवून लावली आहे. मागील सुनावणी दरम्यान कोर्टाने आपला निर्णय दाखवून ठेवला होता.
नेमकं प्रकरण काय?
राहुल गांधी यांनी 2019 आली बंगळूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिपणी केली होती. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय मिश्रा यांनी राहुल गांधी विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांच्या विरोधात मानहानीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
राहुल गांधी यांनी ट्रायल कोर्ट मध्ये सुरू असलेली कारवाई रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 16 फेब्रुवारी रोजी राहुल गांधी यांच्याकडून लिखित बाजू कोर्टात मांडण्यात आली होती. यानंतर जस्टिस अंबुज नाथ यांच्या खंडपीठाने निर्णय राखून ठेवला होता.