जळगावः शहारतील शिवाजी नगरातील खडके चाळ येथील माहेर आलेल्या विवाहितेला मुंबई येथे सासरी घरातील वादाच्या कारणावरून अंगावरील दागिने काढून मारहाण करत शारिरीक व मानसिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिवार दि. १० फेब्रुवारी रोजी शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील खडके चाळ येथील माहेर असलेल्या दिप्ती राहूल निकम यांचा विवाह मुंबई येथील राहूल अशोक निकम यांच्याशी झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेले. त्यानंतर विवाहितेला घरातील वादातून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली तसेच विवाहितेच्या अंगावरील श्रीधन काढून घेतले. तसेच सासरच्या मंडळींनी शारिरीक व मानसिक छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. शनिवार दि. १० फेब्रुवारी रोजी दुपारी विवाहितेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती राहूल अशोक निकम, सासू आशा अशोक निकम, सासरे अशोक यादव निकम, नणंद स्मिता किरण घडंकूश, दीर सचिन अशोक निकम, चुलत दिरानी भारती मिलींद निकम. माम सासरे दिनेश सिताराम शिरसाठ सर्व रा. मुंबई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार पुरूषोत्तम वाघळे हे करीत आहे..