पहिल्याच रात्री वधू-वराचा मृत्यू; एकाच चितेवर अंत्यसंस्कार…

0

 

बहराइच, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे गुरुवारी नवविवाहित जोडप्याचा हनिमून दरम्यान मृत्यू झाला. पोलिसांच्या अहवालानुसार, लग्नाच्या पहिल्याच रात्री वधू-वरांना हृदयविकाराचा झटका आला. दोघांचे मृतदेह बेडवर पडलेले आढळले. दोघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, 30 मे रोजी 24 वर्षीय प्रताप यादव यांचा विवाह 22 वर्षीय पुष्पा यादवसोबत झाला होता. 31 मे रोजी संध्याकाळी वर आपल्या वधूसह घरी परतले. लग्नानंतरचे सर्व विधी आटोपून ३१ मेच्या रात्री दोघेही खोलीत झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही बेडवर मृतावस्थेत आढळले.

कैसरगंज पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक राजनाथ सिंह यांनी सांगितले की, खोलीत जबरदस्तीने प्रवेश केल्याची किंवा दाम्पत्याच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्या नाहीत, ज्यामुळे त्यांच्या मृत्यूच्या कोणत्याही गुन्ह्याचा निर्देश होईल. त्याचवेळी हृदयविकाराच्या शवविच्छेदन अहवालातील निष्कर्षांमुळे काही शंका निर्माण झाल्या आहेत.

अहवालात म्हटले आहे की, त्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाला खोलीची तपासणी करण्यासाठी बोलावण्यात आले होते. फॉरेन्सिक इन्स्पेक्टर म्हणाले की, फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम मृत्यूचे कारण शोधण्यासाठी खोली आणि परिस्थितीची तपासणी करत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.