विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शेतात कांद्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी विजेचा पंप सुरु करीत असताना विजेचा जबर धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. १९ रोजी घटना भुसावळ तालुक्यातील तळवेल येथे घडली. याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तळवेल येथील रहिवासी असलेले निलेश उर्फ सोपान गोपाळ पाटील (वय ४६) हे शेतात मंगळवारी पहाटे शेतातील कांदा पिकाला पाणी देण्यासाठी विज पंप सुरु करीत होते. त्यावेळी अचानक त्यांना विजेचा जबर धक्का बसून ते खाली जमीनीवर कोसळून बेशुद्ध अवस्थेत पडले. त्यावेळी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी त्यांना भुसावळ येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासणीअंती मयत घोषित केले.

यावेळी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.