बंगालच्या उपसागरात बाष्पयुक्त वारे, मध्यमहाराष्ट्रात पावसाची शक्यता

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस कोकण आणि मध्यमहाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सध्या थंडीचा जोर असल्यामुळे आंबा बागायतदार सुखावले आहे. या परिस्थिती ढगाळ वातावरण किंवा पाऊस झाला तर, आंब्यावर कीडरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. हे वातावरण चिंता वाढवणारे आहे. बाष्पयुक्त वारे येऊन ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याने पुढील चा दिवस किमान तापमान २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे.

रत्नागिरीमध्ये ३५ अंश सेल्सिअस कमल तापमानाची नोंद झाली आहे. कोकण किनारपट्टी भागातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमान वाढण्याची शक्यता आहे. काही भागात मात्र थंडीचा कडाका कायम राहणार आहे तर येत्या ४८ तासांत मध्य महाराष्ट्र आणि कोकणपट्ट्यामध्ये पावसाची शक्यता हवामानखात्याने वर्तवली आहे. पावसाला पोषक वातावरण तयार झाल्यामुळे अवकाळी सरी होण्याचा अंदाज आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.