लोकशाही न्यूज नेटवर्क
अकोला जिल्ह्याला अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले आहे. या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाळापूर तालुक्यातील टाकली खोजबळ येथे रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे २० मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याबरोबरच ५ बकऱ्या गंभीर जखमी झाल्याचे मेंढपाळाने सांगितले.
अकोला जिल्ह्यात मध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू होता. बाळापुर तालुक्यातील टाकळी खोजबळ येथे बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथील मेंढपाळ शालिकराम बिचकुले हे आपल्या मेंढऱ्यांसह टाकळी येथे आले हाेते.
टाकली येथील शेतकरी शिवाजी पाटील यांच्या शेतामध्ये त्यांची मेंढर चरत होती दरम्यान, रात्रीच्या सुमारास झालेल्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे बिचुकले यांच्या २० बकऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेत पाच बकऱ्या गंभीर झाल्या आहे.