मुलाचे अपहरण करणाऱ्या दाम्पत्याला ४८ तासांत अटक

0

कोल्हापूर , लोकशाही न्यूज नेटवर्क

कोल्हापुरातून एक अपहरणाची घटना उघडकीस आली आहे. आरोपी महिलेला अपत्यप्राप्ती होत नव्हती. या कारणाने तिने एका सहा वर्षाच्या मुलाचे मंदिरातून अपहरण केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 48 तासात या अपहरण करणाऱ्या जोडप्याला गजाआड केले आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मोहन अंबादास शितोळे आणि छाया मोहन शितोळे असं अपहरण करणाऱ्या या दांपत्याचे नाव आहे. हे दोघे आरोपी साताऱ्यातील मेढा या गावचे रहिवासी असून त्यांना अपत्य प्राप्ती होत नव्हती. यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या सुषमा नाईक नवरे यांच्या सहा वर्षाच्या मुलासह कोल्हापुरातील आदमापुर येथील बाळूमामा मंदिरात ून या बाळाचं अपहरण केलं होतं.

दरम्यान मंदिरातील सीसीटीव्ही फुटेच्या आधारे आणि तांत्रिक तपास करून पोलिसांनी अवघ्या 48 तासात या आरोपींना गजाआड केले आहे. मुलाची सुखरूप सुटका झाल्याने त्यांच्या घरच्यांनी सुटकेचा निष्वास सोडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.