जीप-कंटेनरचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

रत्नागिरी-नागपूर महामार्गावर मंगळवेढा तालुक्यातील आंधळगावाजवळ ट्रेलर व जीपमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी (दि. २७) पहाटे ४ वाजेच्या सुमारास आंधळगावाजवळ घडला. या अपघाताची फिर्याद चौडाप्पा कुंभार (रा. गौडगाव, ता. अक्कलकोट) यांनी मंगळवेढा पोलिसात दिली आहे.

फिर्याद चैडाप्पा कुंभार यांची नातेवाईक संगीत कुंभार यांना कराड येथून घेऊन जीप अक्कलकोटकडे निघाली होती. आंधळगावाजवळ रस्त्यालगत पवनचक्कीचे साहित्य घेऊन चाललेला कंटेनर (जीजे १८/पीटी ८७८२) थांबला होता. त्याला मागून आलेल्या जीपने (केए २७/बी ६१८८) जोराचे धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू तर, ३ जण गंभीर जखमी झाले आहे. ही जीप कर्नाटक राज्यातील आहे. अपघात इतका भीषण होता की जीपचा समोरचा भाग कंटेनरच्या खाली घुसला होता. शेवटी जेसीबी बोलावून जीपला ओढून जखमी चालक आणि दोन लहान बालकांना बाहेर काढावे लागले.

अपघाताची माहिती मिळताच सांगोला मिळताच ग्रामीण रुग्णालयाची १०८ क्रमांक रुग्णवाहिकेचे डॉ. वैभव जांगळे व चालक कुंभार यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पोलिसांच्या मदतीने जखमींची मदत केली. दरम्यान, कंटेनर चालक इंद्रजितकुमार सिंग (मझौली बिघा, ता. बाढ, जि. पटना, बिहार) याचे रस्त्याच्या बाजूला इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने रिफ्लेक्टर न लावता वाहन लावल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम धापटे तपास करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.