अडावदजवळ अपघातात दोन जण ठार

0

लोकशाही न्युज नेटवर्क 

बऱ्हाणपूर-अकंलेश्वर महामार्गावर अडावद येथून जवळच असलेल्या गवळी नाल्या जवळ ट्रक व दुध गंगा पिकअप बोलेरोचा भिषण अपघात झाला. काल दि. २२ च्या मध्यरात्री नंतर १ वाजेच्या सुमारास घडलेल्या या हृदयद्रावक घटनेत २ जण ठार झाले आहेत. तर ३ जण गंभिर जखमी झाले आहे. या दुदैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कठोरा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नितीन दामू मोरे (४५, रा.विद्या विहार कॉलनी, चोपडा) आणि गणेश काशिनाथ देशमुख (३२, रा, सुंदरगढी चोपडा) अशी मृत झालेल्यांची नावे असून गुड्डू अरुण देशमुख (३०), बाबा पांडुरंग देशमुख (३०), चूनीलाल खुशाल देशमुख (३०) हे या अपघातामध्ये जखमी झाले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चोपड्याकडुन अडावदकडे येत असलेल्या ट्रक क्र. जी.जे.१२ बी.टी.९३९७ व जळगावहुन चोपड्याकडे जात असलेल्या दुध डेअरीची पिकअप बोलेरो क्र. एम.एच.१९ सी.वाय. ५६७४ यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाल्याने पिकअप बोलेरोमधील दुर्घटनेतील मृतात प्राथमिक शिक्षक नितीन दामू मोरे गणेश काशिनाथ देशमुख यांचा समावेश आहे. तर गुड्डू अरुण देशमुख (३०), बाबा पांडूरंग देशमुख (३२), चुनिलाल खुशाल देशमुख (३१) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे किरण दांडगे, पोउनि जगदिश कोंळबे, शरिफ तडवी, मुकेश तडवी, नासिर तडवी आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.