जळगाव;- कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील दिनांक 20 नोव्हेंबर, 2020 च्या परिपकान्वये कार्तिकी शुध्द एकादशी निमित्त देवस्थानात करावयाचे नित्योपचार समिती मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यासाठी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्याच्यादृष्टीने सामाजिक अंतर राखून व कोरोना संदर्भात सर्व मार्गदर्शक सूचनांचे (SOP) काटेकोरपणे पालन होणार असलेबाबत कळविलेले आहे.
त्यानुसार कार्तिकी शुध्द एकादशी यात्रेच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातून यावर्षीही दिंड्या पंढरपूर येथे दाखल होण्याची शक्यता आहे असे जिल्हादंडाधिकारी सोलापूर यांनी कळविले आहे. तरी विधी व न्याय विभागाच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव/संसर्ग रोखण्याच्या दृष्टीकोनातून जळगाव जिल्ह्यातून भाविकांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दाखल होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.