मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी चौकशीसाठी मुंबईत आलेल्या पटणाचे एसपी विनय तिवारी यांना १५ ऑगस्टपर्यंत क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यामुळे तिवारी यांना मुंबईतली पहीली रात्र गोरेगावच्या एसआरपीएफ कॅम्प घालवावी लागली. तिवारी यांना क्वारंटाईन केल्यानंतर बिहार पोलिसांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आमचा तपास रोखण्यासाठी एसपी विनय तिवारींना होम क्वारंटाईन नव्हे तर हाऊस अरेस्ट केल्याचे बिहार पोलिसांचे म्हणणे आहे. बिहार पोलिसांचा तपास रोखण्यासाठी हे जाणिवपूर्वक पाऊल उचलल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
बिहार डिजेपी गुप्तेश्वर पांडे यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त करणारे ट्वीट केलंय. आयपीएस अधिकृत विनय तिवारी आज पटण्याहून मुंबईत त्यांच्या कर्तव्यावर बिहार पोलिसांचे नेतृत्व करण्यासाठी मुंबईत गेले. पण पालिकेच्या अधिकाऱ्यांनी रात्री ११ वाजता त्यांना जबरदस्ती क्वारंटाईन केलंय. मागणी करुनही त्यांना आयपीएस मेस देण्यात न आल्याचेही पांडे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.