तहसिलदारांना निवेदन सादर
धरणगाव दि. 3-
संविधान बचाओ संघर्ष समितीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले व तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. तहसिलच्या वतीने पंकज शिंदे यांनी निवेदनाचा स्वीकार केला. यावेळी संविधान बचाओ समितीचे तालुका संयोजक ओंकार माळी, निलेश पवार व लक्ष्मण पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले. संविधान बदलण्याचा प्रयत्न करणार्या मनुवादी प्रवृत्तीचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. घटनेच्या चौकटीत न बसणारे आरक्षण देऊन लोकांची दिशाभूल करण्याचे काम हे शासन करत आहे. बहुजन समाजाला जर वेळेवर जाग आली नाही तर गुलामी लागेल,असा सूर वक्त्यांच्या बोलण्यातून जाणवला.याप्रसंगी संविधान बचाओ संघर्ष समितीचे तालुका संयोजक ओंकार माळी, भारत मुक्ती मोर्चाचे प्रदेश सचिव मोहन शिंदे,भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब राजेंद्र माळी, बामसेफचे तालुका अध्यक्ष पी.डी. पाटील सर,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुका अध्यक्ष निलेश पवार, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष गोपाल पाटील, व्ही.टी.माळी सर, लक्ष्मण पाटील राहुल पवार, रविंद्र महाजन, मयूर भामरे, दीपक माळी, गौतम गजरे, किरण सोनवणे, प्रक्षिक निकम, आनंदराज पाटील, विजय माळी, राहुल पाटील, सिराज कुरेशी, सुरेश सोनवणे, सुनिल माळी, रिंकू पाटील, निवृत्ती माळी, नंदलाल माळी, सुनिल बडगुजर, राहुल सोनवणे, श्याम साळुंखे आदी मुलनिवासी बांधव उपस्थित होते. तसेच धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस बांधव उपस्थित होते.