संत सखाराम महाराजांची दिंडी पंढरपूर रवाना

0

अमळनेर (प्रतिनिधी):-  संत सखाराम महाराज वाडी संस्थान तर्फे यंदाही पायी दिंडीने न जाता गाडीने ह भ प प्रसाद महाराज पंढरपूर कडे रवाना झाले.त्यांना सोडण्यासाठी मोजक्या भक्ताच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडला गेला.

सालाबादप्रमाणे पायी होणारी वारी यंदाही कोरोनामुळे रद्द झाल्याने भक्ताचा हिरमोस झाला.सलग दुसऱ्या वर्षी ही पायी दिंडी रद्द झाली असल्याने संत सखाराम महाराजांचे अकरावे गादीपती ह भ प सखाराम महाराज आज जेष्ठ व ४ दि २८ जून २०२१ रोजी दुपारी ४ वाजेला निघाली.दि २५ जून रोजी मंदिरात असलेल्या दरवर्षी दिंडी सोबत जाणारी पताका घेऊ ह भ प प्रसाद महाराजांनी औरंगाबाद कडे प्रस्थान केले.यावेळी महाराजांना दिलीप देशमुख व दिलीप येवले यांनी पुष्पहार घालून आशीर्वाद घेतले.

यापूर्वीच सकाळी ६ वाजेला एस टी महामंडळाच्या माल वाहतूक गाडीने ४ महिने पुरेल एवढ्या खाण्याच्या वस्तू पाठविण्यात आला तर एका गाडीने टाळकरीही रवाना झाले. ह भ प प्रसाद महाराजांचा पहिला मुक्काम औरंगाबाद येथे असून दि २९ जून २०२१ पैठण,दि ३० जून २०२१ शेवगाव,दि १ जुलै २०२१ रोजी पाथर्डी आणि दि ३ जुलै २०२१ रोजी पानसुपारी करत पंढरपूर येथे आगमन होणार आहे.

यावेळी महाराजां सोबत अनिल जोशी,उदय देशपांडे,रमेश जोशी, मनोज भांडारकर,मनोज देवकर,गणेश महाजन,दिलीप पाटील,विनोद पाटील,संजय पाटील,स्वप्नील बडगुजर,नंदू भावसार, विनोद पेंटर,अरुण टेलर,भाऊ चौक,भटू सोनार भक्त गण,पुरुष व महिला उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.