अंतर्नादच्या पुष्पांजली प्रबाेधनमालेत पुण्याचे कवी देवा झिंजाड यांचे भावाेद्गार
भुसावळ ;- कविता म्हणजे अभिव्यक्त हाेण्याचं सशक्त माध्यम. कमी शब्दात अतिशय माेठा अाशय या साहित्य प्रकारातून मांडला जाताेे. तुमच्या-अामच्या काळजात दाबलेला उमाळा म्हणजे कविता हाेय. कवितेत मांडलेला मायबाप समजून घेण्यासाठी संवेदनशील काळीज लागतं, असं परखड मत पुण्याचे कवी देवा झिंजाड यांनी व्यक्त केले.
भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठानने स्वर्गीय पुष्पा वसंतराव पाटील यांचे स्मरण करण्यासाठी तीन दिवसीय पुष्पांजली अाॅनलाइन प्रबाेधनमाला अायाेजित केली अाहे. त्यात मंगळवारी ‘मायबापाच्या कविता’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफताना ते बाेलत हाेते. कवी म. भा. चव्हाण यांच्या ‘अाई उन्हाची सावली अाई सुखाचे नगर, निळ्या अाकाशाएेवढा तिच्या मायेचा पदर’ अाणि कवयित्री बहिणाबाई चाैधरींच्या देरे देरे याेग्या ध्यान… एक मी काय सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ या कवितांनी त्यांनी व्याख्यानाला सुरुवात केली. संकटाचा पहाड फाेडण्याची ताकद मायबापांनी दिलेल्या संस्कारांच्या शिदाेरीत असते. मात्र, अलिकडची टेक्नाेसॅव्ही पिढीला मळकटलेली बंडी, फाटकं धाेतर घातलेल्या बापासाेबत चालायला अन् उभी राहायला लाज वाटते. पण हे चित्र बदलायला हवं, असा संदेशही त्यांनी स्वरचित कवितांतून दिला. संघर्ष, समाज, शिक्षण, व्यथा, वेदना, मायबाप, लेक असे नानाविध विषयांची गुंफण त्यांनी केली. ‘फुले’ नावाची कविता खर्जातील अार्जवात सादर करताना त्यांना गहिवरून अाले हाेते.
माय या दाेन अक्षरी शब्दात संकटांचं वादळ पेलण्याची क्षमता अाहे. तिचं मुलं उन्हात उभं असेल तर ती ‘इकडे मर सावलीत’ असं संतापात म्हणते. ती जाे मर शब्द वापरते ताे म्हणजे प्रेमाचं अत्तर अाहे. पाेराला उन्हाच्या झळा लागू नये ही त्यामागची भावना असते. काळजाच्या तुकड्याशी काळजाने काळजीपूर्वक साधलेला ताे संवाद असताे, असेही कवी झिंजाड म्हणाले. ‘अाई जग दावणारी….अाई हंबरणारी गाय, शिळपाख खाऊनही देई लेकरांना साय’ या कवितेतून त्यांनी अाईची महती वर्णिली.
पुष्पांजली प्रबाेधनमालेचं यंदाचं तृतीय वर्ष अाहे. सांस्कृतिक चवळव प्रवाहीत राहावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला अाहे, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी प्रास्ताविकात नमूद केले. उपक्रमाासाठी जळगावचे बांधकाम व्यावसायिक अजय बढे यांचे पाठबळ लाभत अाहे. सुत्रसंचालन योगेश इंगळे यांनी केले.प्रकल्पप्रमुख अमित चाैधरी, समन्वयक प्रा. श्याम दुसाने, सहसमन्वयक अार. डी. साेनवणे यांच्यासह नियाेजन समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.