शेंदुर्णीत महिलांनी काढला हंडा मोर्चा

0

जामनेर : तालुक्यातील शेंदुर्णी येथील शनि मंदिर मागील खळवाडी परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेविका चंद्रभागाबाई धनगर यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतवर महिलांनी हंडा मोर्चा काढून पाण्याची मागणी केली. हा मोर्चा नगरपंचायत जवळ आल्यानंतर तेथे कोणीही पदाधिकारी नसल्यामुळे संतापाचा उद्रेक झाला होता.

गेल्या अनेक वर्षापासून शनि मंदिराच्या पाठीमागील नवीन वसाहती भागात पाणीपुरवठ्याची वाहिनीच पोहचली नसल्यामुळे या भागात हातपंपावर अवलंबून रहावे लागत आहे. त्यात गेल्या दोन महिन्यांपासून हातपंप बंद असल्याने पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे.
वारंवार मागणी करूनही पाण्याचा प्रश्न सोडविला जात नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी थेट नगरपंचायवर मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला. यावेळी नगरसेविका चंद्रभागाबाई धनगर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून पाणीप्रश्न लवकरात लवकर सोडवावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

या हंडा मोर्चात नगरसेविका चंद्रभागाबाई धनगर यांच्यासह सुशिलाबाई धनगर, कविताबाई धनगर, शांताबाई धनगर, रत्नाबाई धनगर, ज्योतीबाई धनगर, कौशल्याबाई धनगर, प्रमिला धनगर, अलका धनगर, शोभा धनगर, कोकिळा धनगर आदी महिला सहभागी झाल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.