लासुर ता.चोपडा(वार्ताहर)- येथील स्वर्गवासी अभय दामोदर वाघ यांचे प्रथम स्मरणार्थ गावातील पंप नगर भागातील ४०० गरिब कुटूंबांना घरपोच गव्हू व बिस्किटांची पाकीटे वाटप करण्यात आली.
संपुर्ण भारतात सरकारने लॉकडाऊन केल्यामुळे गोरगरिबांना खायायला अन्न नाही. शिवाय हाताला काम नाही. मग जिवन जगायचे कसे? हा प्रश्न सर्वसामान्य माणसांप्रमाणे गोरगरिबांना भेडसावत आहे. कारण सध्या कोरोना विषाणू मुळे परिस्थिती गंभीर होत आहे. दोन वेळचे अन्नधान्य,पैसा आणायचे कोठून? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. आपन सुध्दा समाजाचे देणे लागतो. या उद्देशाने गांवातील वाघ परिवाराने स्वर्गवासी अभय दामोदर वाघ यांचे प्रथम पुण्यस्मरण मोठा साजरा न करता गरिबांना धान्य देवून साजरा करावा. या उद्देशाने त्यांनी जवळ जवळ ४०० कुटूंबांना सोशल डिस्टनसिंग पाळून गव्हाचे व बिस्किटांची पाकीटे यावेळी प्रत्येक कुटूंबांना घरपोच वाटप करण्यात आली.
दरम्यान स्वर्गवासी अभय दामोदर वाघ यांच्या प्रतिमेला त्यांच्या आई श्रीमती शोभाबाई वाघ, पत्नी श्रीमती वंदना वाघ, भाऊ तुषार वाघ, मुलगा हर्षल वाघ, रूचीत वाघ, पुतण्या विराज वाघ, वहिनी रेखा वाघ, पुतणी स्नेहा वाघ यांच्या हस्ते पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
दरम्यान गोरगरिबांना धान्य वाटप तलाठी महासंघाचे माजी उपाध्यक्ष अमृतराव वाघ, भास्कर आबा वाघ, नाशिक येथील आरटीओ जयंत पाटील, डॉ प्रविण चव्हाण, उपसरपंच अनील वाघ,निंबाजी वाघ, गुलाबराव वाघ, सुभाष वाघ, गोरख पाटील,विनोद पाटील,चंद्रकांत वाघ, विवेक वाघ, विठ्ठल वाघ,ज निलेश पाटील, सचिन वाघ, मुकेश वाघ, विकास नथ्थू वाघ,यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.दरम्यान धान्य वाटप साठी गणेश पाटील,अमोल वाघ, विशाल वाघ प्रितेश वाघ,महेश पाटील भुषण बोरसे,प्रफुल्ल पाटील जितेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.