जळगाव :- लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा व महानगर कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. दरम्यान यावेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करून बैठकीला प्रारंभ झाला. या बैठकीत जिल्ह्यातील दुष्काळ, चाराटंचाई, पाणीटंचाईवर चर्चा करण्यात आली.
राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष गफ्फार मलिक यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची जिल्हा बैठक झाली. जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे, मोहन निकम, वाल्मीक पाटील, धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, युवक महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, शीतल साळी, राजीव पाटील, महानगर अध्यक्षा नीला चौधरी, माधुरी पाटील, सलीम इनामदार, अरविंद मानकरी, मझहर पठाण, रिझवान खाटीक, नईम खाटीक, रहीम तडवी, अक्षय चौधरी, किरण राजपूत, प्रकाश पाटील, ईश्वर राहणे, यु. डी. पाटील, धनराज माळी, जय प्रकाश महाडिक, राजू बाविस्कर, संजय पाटील, कौसर काकर, उपस्थित होते.
दरम्यान, राष्ट्रवादीने आज शनिवारी सकाळी ११ वाजता मुंबईत तातडीने पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या बैठकीला उपस्थित राहणार असून जिल्ह्यात आमदार, माजी आमदार, माजी खासदार, प्रमुख पदाधिकारी शुक्रवारी दुपारीच मुंबईला रवाना झाले. उर्वरीत पदाधिकारी देखील बैठकीनंतर निघणार असल्याने शुक्रवारच्या जिल्हा बैठकीकडे बहुतांश पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविली होती.