जळगाव । आजवर केलेली कामे आणि लोकांच्या विश्वासाने आपण विजय संपादन करणार असल्याची प्रतिक्रिया खासदार रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केली.
रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे या विजयाच्या मार्गावर असून त्यांना स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. या संदर्भात प्रसारमाध्यमांशी चर्चा करतांना त्या भारावून गेल्या. निकालाबाबत त्या म्हणाल्या की, मोदी सरकार आणि राज्य सरकारने कामे केली. मी स्वत: गेल्या पाच वर्षात मतदारसंघात अनेक विकास कामे केली. त्याचे फळ मला आज मिळाले. लोकांचा विश्वास संपादन करण्यात मला यश मिळाले आहे. हा विजय विकासकामांचा व जनतेच्या विश्वासाचा असल्याचा त्यांनी सांगितले