जळगाव :- मतमोजणीच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पुरेसी व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे भर उन्हामध्ये, वाढत्या तापमानात मतमोजणीसाठी असलेले कर्मचारी, बंदोबस्तासाठी असलेले पोलीस, राजकीय प्रतिनिधी, पत्रकार आदींचे हाल झाले. पाणी मिळाले तर त्यासाठी ग्लास नव्हते अशी परिस्थिती अनेकदा निर्माण झाली होती. जेवण करतांना पाणी पिण्यासाठी ग्लास नसल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना वाटीतच पाणी घेऊन पाणी प्यावे लागले.