मोठी बातमी.. जळगावातून 1500 किलो गांजा जप्त; मुंबई NCBची मोठी कारवाई

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या राज्यात ड्रग्ज विरोधी मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या जात असतांना  मुंबई एनसीबीच्या पथकाने जळगावात  एक मोठी कारवाई करत तब्बल 1500 किलो गांजा जप्त केला आहे. एनसीबीच्या पथाकाने यावेळी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरु आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रतील जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ एनसीबीच्या पथकाने तब्बल 1500 किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी एनसीबीने दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हा गांजा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून आणला जात होता.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.