‘मी पुन्हा येणार’वरून खडसेंचा फडणवीसांवर टोला ; म्हणाले…

0

जळगाव :  ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील नाराजी पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे.  महाराष्ट्राच्या जनतेत आणि मला मानणाऱ्यांमध्ये एक संताप आहे. या संतापाचं कधी एकत्रीकरण होऊन स्फोट होईल हे सांगता येत नाही, अशा शब्दांमध्ये खडसे यांनी असा इशाराच दिला आहे.आपल्या वाढदिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

मंत्रिपद गेल्यापासूनच खडसेंच्या मनात पक्षातून डावललं गेल्याची भावना आहे. ती नाराजी ते सातत्यानं बोलून दाखवत असतात. यावेळी मात्र त्यांनी फडणवीसांच्या एका घोषणेचाही उल्लेख केला.

‘प्रतिकूल परिस्थिती असतानाही एकेकाळी गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, गडकरी, गिरीश बापट, मुनगंटीवार आणि माझ्यासारख्या काही नेत्यांनी कष्टानं पक्ष उभारला होता. मागच्या वेळेस युती नसतानाही एकहाती सत्ता राज्यात मिळाली होती. आता केंद्रात सरकार असताना, अनुकूल परिस्थिती असताना सत्ता का गेली,’ असा प्रश्न त्यांनी केला. ‘मी येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार ही गोष्ट जनतेला आवडली नाही का? की वेगळं काही कारण होतं? याचा शोध मी घेतोय,’ असा टोला खडसेंनी फडणवीसांना लगावला. मेहनत आणि कष्टाने आम्ही महाराष्ट्रात भाजपाचं एकट्याच्या बळावर सरकार आणलं होतं. त्या कालखंडात आत्ता आहेत त्यातील अनेक लोक नव्हतेसुद्धा. हे अलीकडे १०-१२ वर्षात जन्माला आलेले राजकारणात चमकायला लागले आहेत आणि आम्हाला अक्कल शिकवत आहेत.” अशी निनावी टीका केली.

अनेक पक्षांनी मला आॅफर 

माझ्यावर अन्याय झाल्याचे कार्यकर्त्यांची भावना असून कोरोनाचं संकट दूर झाल्यावर मी सर्वांना भेटून त्यांच्या भावना जाणून घेईल. तसेच राज्यभर दौरा करेल. अनेक पक्षांनी मला त्यांच्या पक्षात येण्यासाठी आॅफर दिली पण एकनिष्ठ पक्ष सोडण्याचा विचार कधीही मनात आला नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.