मुंबई : राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून आता तो ३२० वर पोहोचला आहे. मंगळवारी राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ३०२ एवढी होती. परंतु बुधवारी तो आकडा वाढून ३२० वर पोहोचला. यामध्ये मुंबईत १६ आणि पुण्यात २ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत.
दरम्यान, देशात काल मंगळवारी करोनाची लागण झालेले ३१५ नवे रुग्ण आढळले. या बरोबरच देशात करोनाग्रस्तांची संख्या १६०० हून अधिक झाली आहे. मंगळवारी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले. काल महाराष्ट्रात ८२, तर तामिळनाडूत ५७ नवे रुग्ण आढळले. दिल्लीत २३ नवे रुग्ण आढळले. या पूर्वी सोमवारी देशात २२७ नवे रुग्ण आढळले होते. सोमवारपर्यंत ही संख्या १३४७ इतकी होती. दरम्यान, या आजाराचा सामुदायिक प्रसार अजून सुरू झाला नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.