नवी दिल्ली : नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तारखा (रविवार) केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. त्यानुसार सर्वत्र आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यामध्ये देशभरात सात टप्प्यांत मतदान घेतले जाणार असून 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान मतदान होणार असून, या निवडणुकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
महाराष्ट्रातील चार टप्प्यातील मतदान
पहिला टप्पा – 11 एप्रिलला महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान
दुसरा टप्पा –18 एप्रिलला महाराष्ट्रात 10 जागांसाठी मतदान
तिसरा टप्पा – 23 एप्रिलला महाराष्ट्रात 14 जागांसाठी मतदान
चौथा टप्पा – 29 एप्रिलला महाराष्ट्रात 17 जागांसाठी मतदान
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी मतदान
वर्धा, रामटेक, नागपूर, भंडार – गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ- वाशिम
दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी मतदान
बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर
तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी मतदान
जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान
नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व, उत्तर मध्य, दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई.
असा असेल निवडणूक कार्यक्रम
– अर्ज भरण्याची तारीख – 18 मार्चपासून
– अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 25 मार्च
– अर्ज छाननी – 26 मार्च
– अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – 28 मार्च
– मतदानाची तारीख – 11 एप्रिल
– निकाल – 23 मे