जळगाव | प्रतिनिधी
येथील भारत विकास परिषदेतर्फे मंगळवारी दि.17 रोजी जयकिसन वाडीतील नवजीवन मंगल कार्यालय येथे ‘भारत को जानो’ प्रश्नमंजूषा स्पर्धा व ’चेतना के स्वर‘ राष्ट्रीय समूहगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 9.15 ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्रश्नमंजूषा तर दुपारी 1 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत समुहगान स्पर्धा व स्पर्धेनंतर बक्षीस वितरण होणार आहे. कार्यक्रमास ऍड. सुशील अत्रे, अनिल अभ्यंकर, एशियन योगा चॅम्पीयन श्रद्धा लढ्ढा, वीणा राव, राजेश चौधरी, समीर रोकडे, अजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. उपस्थितीचे आवाहन अध्यक्ष प्रसन्न मांडे, सचिव विशाल चोरडिया, प्रश्नमंजूषा प्रकल्प प्रमुख उज्ज्वल चौधरी, उमेश पाटील व समुहगान प्रकल्प प्रमुख अनिकेत पवार, चंद्रशेखर महाजन यांनी केले आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post