देशातील बेरोजगारीचे प्रमाण वाढले

0

नवी दिल्ली :- देशातील बेरोजगारीचा दर वाढला असून गेल्या 2.5 वर्षातील हा बेरोजगारीचा सर्वाधिक आकडा असल्याचे समोर आले आहे.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (सीएमआयई) बेरोजगारीसंदर्भात नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात ही आकडेवारी समोर आली आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार देशातील बेरोजगारीचे प्रमाण अधिकच वाढले असून फेब्रुवारी महिन्यातील बेरोजगारी वृद्धीचा दर 7.2 हा गेल्या 2.5 वर्षातील सर्वाधिक ठरला आहे. सप्टेंबर 2016 मध्ये बेरोजगारी वृद्धीचा दर 5.9 टक्के एवढा होता.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारमधील मंत्र्यांकडून मोठ्या प्रमाणात नोकऱ्या दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, बेरोजगारीची वाढती आकडेवारी मोदी सरकारला धोक्याची घंटा असणार आहे. यापूर्वीही एका अहवालातून गेल्या 45 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी यंदाच्या वर्षात असल्याचे स्पष्ट झाले होते. अशा वेळी बेरोजगारीचा हा आकडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आव्हान ठरू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.