नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात घट झाली आहे. गेल्या२४ तासात 1 लाख 96 हजार 427 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ३ हजार 511 जणांचा बळी गेला आहे. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण घटले, त्याचप्रमाणे कोरोनाबळींच्या संख्येतही घट झाल्याने दिलासा मिळत आहे.
गेल्या 24 तासात भारतात 1 लाख 96 हजार 427 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 511 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 3 लाख 26 हजार 850 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 69 लाख 48 हजार 874 वर गेला आहे. देशात 2 कोटी 40 लाख 54 हजार 861 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 7 हजार 231 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 25 लाख 86 हजार 782 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 19 कोटी 85 लाख 38 हजार 999 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.