तलाठी पथकावरील हल्लेखोर मोकाटच ; तलाठी संघाचे लेखनीबंद आंदोलन

0

अमळनेर (प्रतिनिधी):-गंगापुरी (ता.अमळनेर) येथील तापी नदीपात्रात रात्री १२.३० वाजता वाळूमाफियांकडून झालेल्या महसूल कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याप्रकरणी अमळनेर तालुका तलाठी संघाने प्रांताधिकारी सीमा अहिरे यांना लेखनीबंद आंदोलनाचे निवेदन सादर केले.

अवैध गौणखनिज वाहतुकीस आळा घालण्याकामी म. उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग अमळनेर आणि म.तहसीलदार सो अमळनेर यांच्या सह पथक गेले असता पथकातील सदस्य तथा शहर तलाठी अमळनेर गणेश राजाराम महाजन यांचेसह पथकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे सदर घटनेचा अमळनेर तालुका तलाठी संघ जाहीर निषेध करीत आहे त्याबाबत दि.22/05/2021 रोजीच सदर घटनेची फिर्याद अमळनेर पो.स्टे. येथे देण्यात आली असुन अद्यापपर्यंत गुन्हा दाखल होऊन 2 दिवस उलटून सुद्धा आरोपींना अटक झालेली नाही म्हणुन दि. 24/5/2021 पासुन आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत कोविड विषयक आणि नैसर्गिक आपत्ती वगळता लेखणीबंद आंदोलन पुकारण्यात येत आहे असे निवेदनात म्हटले आहे.

यात कार्यकारणी नावे आहेत त्या प्रमाणे अध्यक्ष गणेश राजाराम महाजन,उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, कार्याध्यक्ष स्वप्नील कुलकर्णी, चिटणीस मुकेश देसले, जिल्हा  उपाध्यक्ष योगेश पवार, सह चिटणीस पिंटू चव्हाण, ऑडिटर वाय आर पाटील, व तलाठी बांधव उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.