जिल्ह्यात नोंदणीकृत 274 शाळा : 3717 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश

0

शिक्षण हक्क कायदयानुसार नोंदणी, प्रवेशासाठी वय किमान 6 वर्षे पुर्ण

जळगांव.दि.17-
शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. या राखीव जागांसाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. गत 10 दिवसांमध्ये जिल्ह्यातून तब्बल 4 हजार 307ऑनलाइन अर्ज शिक्षण विभागाच्या पोर्टलवर भरण्यात आले आहेत. जिल्ह्यातील आरटीई नोंदणीकृत 274 शाळांमध्ये 3717 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरण्याचा कालावधी 5 ते 22 मार्च पर्यंत राहणार आहे. यावर्षी आरटीई प्रवेशांतर्गत 274 शाळा पात्र ठरल्या आहेत. प्रवेशासाठी किमान वय 6 वर्षे 0 महिने 1 दिवस ते 6 वर्षे 11 महिने 29 दिवस एवढे आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार जिल्ह्यातील आरटीई नोंदणीकृत शाळांमधील 25 टक्के राखीव जागांसाठी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया 5 मार्चपासून सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील खासगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहायित 274 शाळांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 22 मार्चपर्यंत पालकांना 25 टक्के मोफत प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. त्यानंतर शिक्षण विभागाकडून प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. वेळापत्रकानुसार पहिल्या फेरीत शाळेपासून एक कि.मी. किंवा त्यापेक्षा कमी अंतरावरील पाल्यांचा प्रवेशासाठी विचार करण्यात येईल. यावर्षी जागा कमी असतानासुद्धा मोठ्या प्रमाणात पालकांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. 22 मार्चपर्यंत जवळपास सात हजारांवर ऑनलाइन अर्ज प्राप्त होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी 2हजार 482 जागा असतानासुद्धा केवळ 1हजार 900 पाल्यांनाच इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळाला. उर्वरित जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा तशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत न्याय द्यावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
जिल्ह्यातील 100 जागांमधे घट,.
जिल्ह्यात नोंदणीकृत 207 शाळा असून आतापर्यत 4307 ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्राप्त झालेले आहेत. गतवर्षी जिल्ह्यात आरटीई संलग्न इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये 25 टक्के प्रमाणे 3 हजार 817 जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. 5हजार 550 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 2हजार 648 विद्याथ्यार्ंनी प्रवेश घेतला होता. तर 1हजार 169 जागा रिक्त राहिल्या होत्या.
यावर्षी मात्र त्यात 3 हजार 717 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत राखीव जागांमध्ये 100 ने घट झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.