गँसचे भाव वाढल्यामुळे ग्रामीण भागात चुली पुन्हा पेटु लागल्या

0

जळगाव प्रतिनिधी :–  गँसचे भाव एक हजार रुपयात मिळु लागल्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटु लागल्यामुळे सरपण जमा करण्यासाठी मजुरांची पुन्हा धावपळ सुरु झाली आहे.

घरातील निघणारा धुर कमी व्हावा ,महिलांच्या फुसफुसा आजार कमी करुन जंगल तोड कमी करण्यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजनाअंर्तगत गोरगरीबांचा घराघरात गँस पोहोचले आहे.मात्र गँसचे भाव वाढल्यामुळे गँसचे खाली सिंलेडर आता रीकामे पडुन असल्याचे चित्र दिसुन येत आहे.

गँसचे भाव वाढल्यामुळे ग्रामीण भागात कठीण झाले आहे.शासनाकडुन फत्त शंभर रुपयात गँस कनेक्शन मिळाल्यांने काही दिवस आंनद मिळाला आता गँसचे सिंलेडर भरण्यासाठी  एक हजार रुपये लागत असल्यामुळे महिलांचे आर्थिक नियोजन करावे लागत आहे.

ग्रामीण भागात दुष्काळ ग्रस्त परीस्थीती निर्माण झाल्यामुळे पहिलेच काम नाही जेमतेम मजुरी मिळत असुन कृटूंबाचे उदरनिर्वाह करावा लागत आहे.कापुस वेचणी अतिम टप्यात आली असल्यामुळे सिंलेडर भरण्यासाठी पैसा जमा करण्यांचे मजुरां समोर आव्हान आहे.८१० रुपयाचा सिंलेडर व ३० रुपये भाडे ८४०रुपयात भरलेले सिंलेडर मिळत असल्यामुळे महिलांना पुन्हा चुली पेटवित असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसुन येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.