खामगावातील आठवडी बाजारात भीषण आग; 12 दुकाने जळून खाक

0

खामगाव (प्रतिनिधी)- येथील आठवडी बाजारातील दुकानांना अचानक भीषण आग लागल्याची घटना 10 एप्रिल रोजी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. या अग्नी तांडवात सुमारे 12 भाजी पाल्यांची दुकाने जळून खाक झाली आहेत. आगीच्या भीषणतेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

खामगाव शहरातील मध्यवस्तीत आठवडी बाजार आहे. काही व्यावसायिकांनी येथेच सुका आणि ओला भाजीपाल्याची साठवणूक करण्यासाठी गोदामे उभारली आहेत. यातील एका दुकानाला रात्री आठ वाजताच्या सुमारास  आग लागली. त्यानंतर एकापाठोपाठ 10-12 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखुन अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. रात्री उशीरापर्यंत घटनास्थळी आग विझविणे सुरू होते. रात्री उशीरापर्यंत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. आगीचे भीषणतेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दुकानांना लागलेल्या आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. आगीच्या ज्वाळासोबतच प्रचंड धूराचे लोटही परिसरात पसरले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.