कॉंग्रेस-जेडीएसच्या बंडखोरांची पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव

0

नवी दिल्ली  -कर्नाटकमधील कॉंग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोरांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी आमदार म्हणून अपात्र ठरवण्याच्या निर्णयाला याआधीच आव्हान दिले आहे. त्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी आता केली आहे.

काही आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे कर्नाटकमधील कॉंग्रेस-जेडीएस आघाडी सरकार कोसळले. सरकार कोसळण्याआधी विधानसभेचे तत्कालीन सभापती के.आर.रमेश कुमार यांनी दोन्ही पक्षांच्या 17 बंडखोरांना आमदार म्हणून अपात्र ठरवले. त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका बंडखोरांनी न्यायालयात दाखल केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.