राजस्थानात भोजनातून 36 मुलांना विषबाधा !

0

जयपूर : राजस्थानात मध्यान्ह भोजनातून 36 मुलांना विषबाधा झाल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानच्या जाबरकिया या गावात सरकारी माध्यामिक शाळेत ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मुलांना मध्यान्ह भोजनात कढी-भात देण्यात आला होता. मात्र तो खाल्ल्यानंतर मुलांची प्रकृती बिघडल्याचे म्हटले जात आहे. उपचारासाठी मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गंगापूर येथील सरकारी रुग्णालयात मुलांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी काही मुलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मुलांना दूषित कढी भात दिला गेला असा आरोप करण्यात आल्याची माहिती करोई पोलीस ठाण्याचे प्रभारी मुकेश कुमार वर्मा यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.