नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ झालेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या पहिल्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झाले. परंतु रक्कम जमा होताच काही तासांतच हि रक्कम परत काढून घेण्यात आली.
हा प्रकार सिन्नर येथील अशोक लहागमे यांना रविवारी दुपारी दोन हजार रुपये जमा झाल्याचा एसएमएस आला. मात्र त्यांच्या खात्यातून ही रक्कम परत काढून घेण्यात आल्याचा दुसरा एसएमएस त्यांना आला. रविवारची सुट्टी असल्याने त्यांना बॅँकेत जाऊन त्याची माहिती घेता आली नाही. सोमवारी त्यांनी स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी विचारले असता, त्यांनी मुंबई कार्यालयाला ईमेल करा असे सांगत हात वर केले.